आज १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन.
त्याच्या स्मरणार्थ हा दिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून २०१५ पासून सर्वत्र साजरा केला जात आहे. वाचन संस्कृती शालेय जीवनापासूनच रुजावी. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. म्हणून या दिवसाकडे पाहिले पाहिजे.
आज आपण शालेय विद्यार्थ्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की अभ्यासाशिवाय पुस्तक वाचताना दिसत नाहीत. (काही ठिकाणी हा अपवाद आहे. ) यामुळे भारतीय प्राचीन ग्रंथातून मिळणारे संस्कारक्षम ज्ञान बाजूला झाले आहे. उत्तम जगण्याच्या जीवनशैली चे अनेक उदाहरणे रामायण महाभारत ग्रंथातून मिळतात. असे अनेक ग्रंथ संपदा आपल्याकडे आहे. असे पुस्तके वाचनाची आवड नसल्याने मिळत नाहीत. म्हणून या पिढीला आदर्श मुल्य कशी मिळणार ? हे अवघड झाले आहे.
मुलांवर संस्कार होणे अत्यंत आवश्यक गोष्टी मोबाइल, टि.व्ही मुळे कठीण होत आहे. यातून मुलांच्या मनावर परिणाम होत आहे. पूर्वी आई- बाबा, आजी-आजोबा मुलांसोबत गप्पा मारत असताना संस्कारक्षम कथा, गोष्टी, प्रसंग सांगते जात होते. मुलांना संस्कारक्षम करणारी कुटुंब व्यवस्था च दुभंगलेले आहे.
म्हणून वाचन संस्कृती तून विद्यार्थ्यावर संस्कारक्षम वाचन साहित्य देवून हे साध्य करता येईल का? यामध्ये प्रवास वर्णन, ललित साहित्य, कथा, कांदबरी, व्यक्ति चरित्र असे विपूल साहित्य आहे.
महाराष्ट्रात अनेक शाळेतून वाचू आंनदे,अवांतर वाचन अश्या तासिकाच शालेय वेळापत्रकात सहभागी केलेल्या आहेत. स्वंतत्र ग्रंथालयात अनेक पुस्तके उपलब्ध करून दिले जात आहेत.
यातूनच एक संस्कारक्षम व संस्कृती संवर्धन करणारी एक पिढी निर्माण होईल. हि काळाची गरज आहे. अनेक पुस्तकांमुळे अनेकांच्या जीवनात फार मोठी क्रांती झालेली आहे.
वाचनातून आत्मविश्वास, शब्दसंग्रह, लेखन कौशल्य, संवाद शैली, संभाषण उत्तम होते. संस्कार व वैचारिक प्रगल्भता जगविण्यासाठी वाचन संस्कृती ची जोपासना करणे आवश्यक आहे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
© दत्ता केशवराव माने
जनकल्याण निवासी विद्यालय,
हरंगुळ (बु) लातूर
